प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्ही कर ‘जैसे थे’
नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, गुरुवारी त्यांच्या कार्यकाळातील अखेरचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यात कर रचनेत कोणताही बदल झालेला नाही. कराचे दर तेवढेच राहणार असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करातही बदल झालेले नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीय करदात्यांना अंतरिम अर्थसंकल्पात काहीच लाभ नसल्याचे चित्र आहे.
निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सरकारची भविष्यातील योजना मांडली. आगामी 2047 पर्यंत भारताला विकसीत बनवण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. गेल्या 10 वर्षांत अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा झाली आहे. सरकारकडून जनतेच्या आशा आणि अपेक्षा आहेत. गेली 10 वर्षे परिवर्तनाची आहे. सर्वांच्या पाठिंब्याने, सर्वांचा विकास घेऊन पुढे जात आहोत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा आणि नवे ध्येय मिळाले आहे.
अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी सांगितले की, पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 22.5 लाख कोटी रुपये कर्ज म्हणून देण्यात आले आहेत. 54 लाख लोकांचे कौशल्य वाढवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. यामुळे लोकांच्या क्षमता वाढल्या आहेत. महिला सक्षमीकरणावर सरकारचा भर आहे. 10 वर्षात यात मोठा बदल दिसून आला आहे. पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरे महिलांसाठी बांधण्यात आली आहेत. सर्वसमावेशक विकासावर सरकारचे लक्ष आहे. सरकारने ग्रामीण विकासासाठी अनेक पावले उचलली आहेत. देशात अन्नधान्याबाबतची चिंता दूर करण्यात आली आहे. 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्यात आले आहे. गेल्या 10 वर्षांत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक घरात घर, वीज आणि पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. एमएसपीच्या माध्यमातून ग्रामीण उत्पन्नात वाढ झाली आहे. सामाजिक न्यायाला सरकारचे प्राधान्य आहे. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या सक्षमीकरणावर सरकारचा भर आहे. गरिबांचे कल्याण हेच देशाचे कल्याण आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. 78 लाख विक्रेत्यांना पीएम स्वानिधीकडून मदत मिळाली आहे. 34 लाख कोटी रुपये थेट जनधनद्वारे हस्तांतरित करण्यात आले आहेत. 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. पंतप्रधान किसान योजनेचा 11.8 कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. 1.8 कोटी शेतकरी डिजिटल कृषी बाजारपेठेत आले आहेत. 390 विद्यापीठे उघडण्यात आली आहेत. स्किल इंडिया मिशनचा 1.4 कोटी तरुणांना फायदा झाला आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ 4 कोटी शेतकऱ्यांना मिळाला आहे. 11.8 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेद्वारे सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. स्किल इंडिया मिशनचा 1.4 कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 390 विद्यापीठे उघडण्यात आली आहेत.गरिबांच्या कल्याणामुळे देशाचे कल्याण होईल. त्यामुळे या सरकारचे लक्ष गरीब वर्गावर राहिले आहे. पीएम स्वानिधी योजनेतून ७८ लाख विक्रेत्यांना मदत मिळाली आहे. जनधनच्या माध्यमातून 34 लाख कोटी रुपये थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
