नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. भारत-पाकिस्तान फाळणी हिंदू महासभेमुळे केल्याचे सनसनाटी विधान मौर्य यांनी केलेय. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघाले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीला मोहम्मद आली जिन्ना नव्हे तर हिंदू महासभा जबाबदार होती असे मौर्य यांनी उत्तरप्रदेशातील बांदा येथे सांगितले.
मौर्य म्हणाले की, की, हिंदू राष्ट्राची मागणी करणारे लोक देशाचे शत्रू आहेत. भारताची राज्यघटना सांगते की श्रद्धा, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही. जर एखादा हिंदू हिंदू राष्ट्राबद्दल बोलत असेल तर इतर तेच का करू शकत नाहीत. लोकांचे वर्णन करताना. हिंदू महासभेने हिंदू राष्ट्राविषयी फार पूर्वीच बोलले होते, त्यामुळे भारत आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. भारत आणि पाकिस्तान जीनांमुळे वेगळे झाले नाहीत, तर हिंदू महासभेची दोन राष्ट्रांची मागणी हे त्याचे कारण होते असे मौर्य यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
