मुंबई, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षित तिकिटांच्या काळाबाजार/दलालांचा सामना करण्यासाठी आणि बोनाफाईड प्रवाशांचे हित जपण्यासाठी तिकीट दलालांविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे. सायबर सेलकडून मिळालेल्या डेटा आणि इतर इनपुटच्या आधारे मध्य रेल्वेचे आरपीएफ पथक छापे टाकत आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात हे छापे टाकण्यात आले.
चालू वर्षात एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दलालीच्या २६९ गुन्ह्यांची नोंद करण्यात येऊन आतापर्यंत ३१७ जणांना रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत अटक करण्यात आली असून त्यांना रु. ३.४२ लाख दंड वसूल करण्यात आला.
या २६९ प्रकरणांपैकी २३ एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या चालू वर्षात एकट्या मुंबई विभागात दलालीचे ९७ गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत ११७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ भुसावळ विभागात ७२ गुन्हे दाखल झाले असून ७७ जणांना अवैध धंदेप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुणे विभागातील आरपीएफने ५६ गुन्हे दाखल करून ७४ जणांना अटक केली, नागपूर विभागात ३६ गुन्ह्यांसह ४१ जणांना अटक, सोलापूर विभागात ८ गुन्हे दाखल करून ८ जणांना अटक करण्यात आली.
मध्य रेल्वेचे आरपीएफ आयटी सेल आणि कौशल्य विकास केंद्र प्रबळ आणि इतर सारख्या विविध सॉफ्टवेअरने सुसज्ज आहे जे ई-टाउटिंग तपास, सायबरस्पेस पाळत ठेवणे, सीसीटीव्ही मॉनिटरिंग इ. मध्ये सहाय्य प्रदान करते. मागील वर्षाच्या याच कालावधीत आरपीएफने दलालीच्या १७८ प्रकरणांची नोंद केली होती आणि २०८ जणांना अटक करून रु.६.६४ लाख दंड वसूल केला.
मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे आणि ऑनलाइन ई-तिकीटिंगमध्ये गुंतलेल्या दलालांकडून तिकीट खरेदी करू नये कारण ते अशा तिकीटावर प्रवास करू शकत नाहीत तसेच कायदेशीर कारवाईमुळे तिकीट अवरोधित केल्यास त्यांच्या पैशांचे नुकसान होऊ शकते.
हिंदुस्थान समाचार
