नवी दिल्ली, 21 जून (हिं.स.) :
ऑपरेशन
सिंधू अंतर्गत भारतीयांना इराणमधून सुरक्षित भारतात आणले जाते आहे. आता भारताने
घोषणा केली आहे की, दोन्ही शेजारील देशांच्या औपचारिक विनंतीनंतर नेपाळ आणि
श्रीलंकेतील नागरिकांना इराणमधून स्थलांतरित करण्याचे काम करणार आहे. मध्य
पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. इस्रायलने
इराणविरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले आहे. त्याचे उद्दिष्ट इराणच्या आण्विक
महत्त्वाकांक्षांना आळा घालणे आहे. त्याचवेळीइराणने देखील याला जोरदार प्रत्युत्तर
दिले आहे.
तेहरानमधील
भारतीय दूतावासाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, नेपाळ आणि श्रीलंका सरकारच्या विनंतीनुसारइराणमधील भारतीय दूतावासाच्या स्थलांतर
प्रयत्नांमध्ये नेपाळ आणि श्रीलंकेतील नागरिकांचाही समावेश असेल. दूतावासाने
आपत्कालीन संपर्क क्रमांक देखील जारी केले आहेत. नेपाळ आणि श्रीलंकेतील नागरिकांना
टेलिग्राम किंवा आपत्कालीन लाईन्स +९८९०१०१४४५५७, +९८९१२८१०९११५ आणि + ९८९१२८१०९१०९ द्वारे त्वरित संपर्क
साधण्याचा सल्ला दिला आहे.
इराणमधील
बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी
भारताने ऑपरेशन सिंधू अंतर्गत त्यांची स्थलांतर मोहीम सुरू केली आहे. आज सकाळी तुर्कमेनिस्तानमधील
अश्गाबात येथून भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे एक विशेष विमान दिल्लीत दाखल झाले.
त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा आणखी एक यशस्वी स्थलांतर करण्यात आले. जेव्हा
तेहरानने त्यांचे हवाई क्षेत्र पुन्हा उघडल्यानंतर २९० भारतीय विद्यार्थी
प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीरमधील इराणमधील मशहाद येथून सुरक्षित परतले.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
