cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Article > वन आणि अर्थव्यवस्था : पैशांपलीकडचा हरवलेला संवाद
Article

वन आणि अर्थव्यवस्था : पैशांपलीकडचा हरवलेला संवाद

CliQ INDIA
Last updated: March 22, 2026 6:36 am
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

मार्च २१. आंतरराष्ट्रीय वन दिन. दरवर्षी आपण हा दिवस साजरा करतो. संदेश दिले जातात, उपक्रम राबवले जातात, आणि काही काळासाठी का होईना, आपण वनांविषयी बोलतो. पण एक प्रश्न मनात अलगद उमटतो — आपण खरंच वनांशी जोडलेलो आहोत का, की फक्त त्यांच्याविषयी बोलण्यापुरतेच मर्यादित आहोत?

यंदाचा विषय आहे “वन आणि अर्थव्यवस्था”. पहिल्या दृष्टीक्षेपात हा विषय आपल्याला बाजारपेठ, पैसा, उद्योग आणि विकासाशी जोडलेला वाटतो. पण जरा थांबून, शांतपणे विचार केला तर लक्षात येतं की कदाचित आपण “अर्थव्यवस्था” या शब्दाचा अर्थच खूप मर्यादित करून टाकला आहे.

आपल्यासाठी अर्थव्यवस्था म्हणजे व्यवहार, नफा, वाढ. पण वनांमध्ये अर्थव्यवस्था वेगळीच असते. तिथे झाडं ऑक्सिजन देतात — कोणताही व्यवहार नाही. नद्या वाहतात — कोणतंही बिल नाही. पक्षी, प्राणी, कीटक, माती — सगळे एकमेकांच्या अस्तित्वाला आधार देतात. ही एक अदृश्य अर्थव्यवस्था आहे, जी नात्यांवर चालते, विश्वासावर टिकते आणि संतुलनावर फुलते.

एक काळ असा होता, जेव्हा माणूस या व्यवस्थेचा एक भाग होता. तो निसर्गात राहायचा, पण त्याच्यावर राज्य करत नव्हता. त्याला माहित होतं की वापर आणि जतन यामध्ये संतुलन ठेवणं आवश्यक आहे. पण हळूहळू काहीतरी बदललं. आपण या साखळीतील भागीदार राहिलो नाही, आपण स्वतःला त्याचा मालक समजू लागलो.

वनं म्हणजे संपत्ती झाली. झाडं म्हणजे लाकूड. नद्या म्हणजे संसाधन. आणि इथूनच कदाचित आपल्या चुकांची सुरुवात झाली. विकासाच्या नावाखाली आपण नात्यांपेक्षा व्यवहारांना महत्त्व दिलं. आपण घेणं शिकलो, पण देणं विसरलो. प्रगती झाली, पण त्या प्रगतीत संबंध हरवले.

वनं मात्र आजही शांतपणे आपल्याला शिकवत आहेत. ती सांगतात की या सृष्टीत काहीही एकटं टिकत नाही. प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून आहे. झाड मातीवर, माती पाण्यावर, पाणी हवामानावर, आणि शेवटी माणूस या सगळ्यावर. म्हणजेच आपण निसर्गावर अवलंबून आहोत, निसर्ग आपल्यावर नाही. हा साधा विचार आपण कुठेतरी मागे सोडून आलो.

आज जर खरंच काही बदल घडवायचा असेल, तर तो केवळ तंत्रज्ञानातून किंवा धोरणांमधून होणार नाही. तो होईल आपल्या विचारांमधून, आपल्या मनातून. संवेदनशीलता ही त्याची पहिली पायरी आहे — निसर्गाला वस्तू म्हणून नव्हे, तर जिवंत अस्तित्व म्हणून पाहणं. त्यानंतर जाणीव — आपल्या कृतींचा परिणाम समजून घेणं. पण फक्त जाणीव पुरेशी नाही, त्यानंतर करुणा येणं आवश्यक आहे. कारण करुणा आपल्याला कृतीकडे नेत असते. आणि त्यातूनच जबाबदारी आणि शेवटी सुसंवाद निर्माण होतो.

एकदा एका वृद्ध शेतकऱ्याने सहज बोलताना सांगितलं होतं, “आम्ही झाडं लावतो कारण आम्हाला सावली हवी म्हणून नाही, तर पुढच्या पिढीला सावली मिळावी म्हणून.” हा विचार किती साधा, पण किती गहन आहे! आजच्या अर्थव्यवस्थेत हा विचार किती दिसतो? आपण गुंतवणूक करतो, पण नफ्यासाठी. आपण योजना करतो, पण तात्पुरत्या फायद्यासाठी. दीर्घकालीन नात्यांची गुंतवणूक आपण विसरलो आहोत.

आज आपण विकासाच्या नावाखाली बरेच काही मिळवलं आहे — मोठी शहरं, वेगवान रस्ते, प्रगत तंत्रज्ञान. पण या सगळ्यात आपण काय गमावलं? स्वच्छ हवा, शांत नदी, संतुलित हवामान… आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाशी असलेलं आपलं नातं.

विकास जर निसर्गाच्या विरोधात उभा राहत असेल, तर तो खरोखर विकास आहे का? की तो एक विसंवाद आहे? आज आपल्याला नवीन तंत्रज्ञानापेक्षा नवीन विचारसरणीची गरज आहे. अशी अर्थव्यवस्था जी नफ्यासोबत निसर्गाचं जतनही करते. जिथे प्रत्येक निर्णय घेताना आपण स्वतःला विचारतो — याचा परिणाम पुढच्या पिढीवर काय होईल?

हा प्रश्न फक्त सरकारचा किंवा संस्थांचा नाही. हा प्रश्न प्रत्येकाचा आहे. आपल्या घरातून, आपल्या छोट्या कृतीतून आपण बदलाची सुरुवात करू शकतो. संसाधनांचा वापर जपून, निसर्गाशी जोडलेले निर्णय घेऊन, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला निसर्गाशी जोडून.

आज मी कोणतंही अंतिम उत्तर देत नाही. फक्त एक प्रश्न विचारतो — आपण कुठे चुकलो? आणि आता पुढे योग्य दिशा कोणती असू शकते? कदाचित या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी असतील, पण त्या उत्तरांमधूनच एक सामूहिक दिशा तयार होऊ शकते.

चूक झाली आहे, पण उशीर झालेला नाही. जर आपण पुन्हा संवेदनशीलतेने सुरुवात केली, जाणीवेच्या पुढे जाऊन करुणेला जागा दिली, तर आपण पुन्हा सुसंवादाकडे जाऊ शकतो. वनं अजूनही तिथेच आहेत — शांतपणे, संयमाने, आपली वाट पाहत.

प्रश्न इतकाच आहे — आपण त्यांचं ऐकायला तयार आहोत का?

— विजयकुमार कट्टी

“Empathy to Harmony” — एक अंतर्मुख प्रवास

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

प्रारंभिक चाचणी पोस्ट: नवीन लेखनाची सुरुवात

चाचणी पोस्ट
राजकारणाचे समाजिक संबंधांवर घातक परिणाम
श्रीराम : कुशल संघटनाचा आदर्श!
गाथा पराक्रमाची : वीर बालपणाच्या आदर्शाची
कोल्हापूर चित्रनगरी विकासाच्या वाटेवर – Hindusthan Samachar Marathi | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article बीजिंग आणि दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणार
Next Article मियामी ओपन २०२६: अल्काराझ आणि सबालेन्काने सलामीचे सामने जिंकले
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?