
नवी दिल्ली, 04 एप्रिल (हिं.स.)मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएल २०२६ च्या सामन्यात खेळत नाहीये. हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव मुंबईचे नेतृत्व करत आहे. सूर्यकुमारने मागील सामन्यात इम्पॅक्ट प्लेअरची भूमिका बजावली होती, पण या सामन्यात तो संघाचे नेतृत्व करत आहे. सूर्यकुमारने सांगितले की, हार्दिक आजारी असल्यामुळे या सामन्यात सहभागी होऊ शकत नाही.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्या या सामन्यात मुंबईकडून खेळत नाहीये. प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, हार्दिकची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तो या सामन्याचा भाग नाही. दिल्लीने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर दीपक चहर, कॉर्बिन बॉश आणि मिचेल सँटनर मुंबई संघात परतत आहेत.
नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमार हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबद्दल बोलताना म्हणाले, हार्दिकची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तो या सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही. म्हणूनच तो आजचा सामना खेळत नाहीये. आज मी त्याची भूमिका बजावत आहे. अंतिम ११ क्रिकेटपटूंध्ये हार्दिकच्या जागी दीपक चहर, बोल्टच्या जागी कॉर्बिन बॉश आणि गझनफरच्या जागी मिचेल सँटनर यांना स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान, दिल्लीने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. या हंगामातील हा त्यांचा पहिला घरच्या मैदानावरचा सामना आहे. त्यांनी यापूर्वी लखनौविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती आणि विजय मिळवला होता. कर्णधाराने यावेळी तोच संघ मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
