कोलकाता, 18 जुलै, (हिं.स.)। बंधन बँकेने आर्थिक वर्ष 2025 – 26 च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. बँकेच्या एकूण व्यवसायात 11% वाढ होऊन तो ₹2.88 लाख कोटींवर पोहोचला आहे. एकूण ठेवींपैकी किरकोळ ठेवींचा वाटा सध्या सुमारे 68% इतका आहे. बँकेच्या विस्तारित वितरण जाळ्यामुळे, कार्यक्षमतेतील सुधारणेमुळे आणि अनुकूल व्यावसायिक वातावरणामुळे ही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत बँकेला ₹372 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.
सध्या बंधन बँक भारतातील 36 पैकी 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 6,350 हून अधिक बँकिंग केंद्रांद्वारे 3.14 कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना सेवा देते. बँकेत सध्या जवळपास 72,000 कर्मचारी कार्यरत आहेत.
वित्त वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत बंधन बँकेच्या ठेवींमध्ये वार्षिक आधारावर 16% वाढ झाली असून एकूण ठेवी ₹1.55 लाख कोटींवर पोहोचल्या आहेत. याच कालावधीत एकूण कर्जवाटप ₹1.34 लाख कोटींवर गेले आहे. चालू खाते व बचत खाते (CASA) गुणोत्तर एकूण ठेवींच्या 27.1% आहे. बँकेचे भांडवली पर्याप्तता गुणोत्तर (CAR) – जो आर्थिक स्थिरतेचा महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो – हे 19.4% इतके मजबूत असून नियामक मर्यादेपेक्षा खूपच जास्त आहे.
बँकेच्या कामगिरीबाबत बोलताना व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ प्रतिम सेनगुप्ता म्हणाले, “बंधन बँकेने FY26 च्या पहिल्या तिमाहीत अनुक्रम नुसार कामगिरी सुधारणे. ठेवींमध्ये मजबूत वाढ आणि रिटेल तसेच होलसेल बँकिंगमध्ये सातत्यपूर्ण प्रगती दिसून आली आहे. कार्यरत परिस्थितीत काही आव्हाने असली तरी आमची कामगिरी आमच्या व्यवसायातील अंतर्गत स्थैर्य आणि आमच्या धोरणात्मक दृष्टीकोनाची ताकद दर्शवते. आम्ही विवेकी जोखीम व्यवस्थापन, कार्यक्षमता वाढवणे आणि आमच्या ग्राहकांसाठी व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो आहोत.”
बँक आपल्या मालमत्तेचे विविधीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करत असून, किरकोळ कर्जपोर्टफोलिओ वाढवण्यावर धोरणात्मक भर देत आहे. कार्यक्षमता वाढवणे, उत्पादकतेत सुधारणा करणे आणि ग्राहकांचा अनुभव अधिक उंचावणे यासाठी डिजिटायझेशनला गती देणे ही आमची प्राथमिकता राहील.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
