बंगळुरु, 1 सप्टेंबर (हिं.स.) यंदाच्या आयपीएल दरम्यान बंगळुरूमध्ये झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझीला हादरवून टाकले नाही तर संपूर्ण क्रिकेट जगतात सुरक्षितता आणि जबाबदारी यावर वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर संघाच्या सामाजिक उपक्रम शाखे ‘आरसीबी केअर्स’ ने आता सहा कलमी धोरणात्मक जाहीरनामा जारी केली आहे, ज्याचे वर्णन त्यांनी आवश्यक कारवाईचा ब्लूप्रिंट म्हणून केले आहे. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून ते बीसीसीआयसोबत गर्दी व्यवस्थापनावर काम करत असल्याचे म्हटले आहे.
आरसीबी केअर्सच्या सविस्तर योजनेचे अनावरण करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सांगितले की, फाउंडेशन चांगले गर्दी व्यवस्थापन प्रोटोकॉल विकसित करण्यासाठी आयपीएल आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन सोबत काम करणार आहे. या वर्षी जूनमध्ये संघाच्या ट्रॉफी सेलिब्रेशन दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुःखद घटनेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. फ्रँचायझीनुसार, ‘आरसीबी केअर्स’ ही एक दीर्घकालीन योजना आहे. जी चाहत्यांच्या कल्याणाशी खोलवर जोडलेली असेल. जूनमध्ये घडलेल्या या दुर्घटनेच्या चौकशीत असे दिसून आले की, सोशल मीडियावर संघाने दिलेल्या आमंत्रणांमुळे लाखो लोक जमले होते. आणि त्यासाठी आरसीबीला जबाबदार धरण्यात आले होते. तपासात असेही आढळून आले की, फ्रँचायझीने समारंभ आयोजित करण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली नव्हती आणि चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी धडपडणाऱ्या चाहत्यांच्या प्रचंड संख्येसमोर पोलिस स्वतःला पूर्णपणे असहाय्य असल्याचे आढळले.
विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ दिखाव्यापुरता मर्यादित नाही. तर त्याने दीर्घकालीन परिणाम निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत आणि दुःखद घटनेनंतर मदतही केली आहे. या घोषणेपूर्वीच आरसीबीने या घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांना २५-२५ लाख रुपयांची आर्थिक मदत देखील दिली होती.
आरसीबी केअर्सच्या जाहीरनाम्यात या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी ६ कलमी योजना आखण्यात आली आहे:
१.आवश्यक मदत द्या: केवळ आर्थिकच नाही तर पीडितांना जलद, पारदर्शक आणि मानवी पद्धतीने मदत करा.
2.सुरक्षित आणि समावेशक वातावरण तयार करा: स्टेडियम आणि कार्यक्रम व्यवस्थापनात रणनीती तयार करा आणि चांगली क्षमता तैनात करा.
3.समुदाय सक्षमीकरण: ग्रामीण कर्नाटकात, विशेषतः सिद्दी समुदायात विकासात्मक कार्यक्रम सुरू करा.
4.स्वतंत्र संशोधन आणि सुरक्षा गुंतवणूक: चाहते-सुरक्षा ऑडिट फ्रेमवर्क तयार करा आणि स्थानिक संघांना गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसादावर प्रशिक्षण द्या.
5.चाहत्यांच्या आठवणी कायम ठेवा: बंगळुरूमध्ये एक विशेष स्मारक तयार करा जे आरसीबीच्या सर्वात उत्साही समर्थकांच्या कथा आणि नावांचा सन्मान करेल.
6.खेळाद्वारे भविष्य घडवा: या संघावरील विश्वास स्टेडियमपुरता मर्यादित नसावा. स्टेडियममध्ये नोकऱ्या निर्माण करा, स्थानिक प्रतिभेचे संगोपन करा आणि क्रीडा व्यावसायिकांच्या पुढील पिढीला पाठिंबा द्या. केवळ स्टँडमध्येच नाही तर खेळाडू, स्टेडियम कर्मचारी आणि स्थानिक प्रतिभांना रोजगार आणि प्रशिक्षण प्रदान करा. या उपक्रमातून हे दिसून येते की आरसीबी केवळ एक क्रिकेट संघ म्हणून नव्हे तर एक जबाबदार संघटना म्हणून समाजाप्रती वचनबद्ध आहे. हे पाऊल फ्रँचायझीच्या क्रिकेटबाहेरील समर्पित सामाजिक भूमिकेवर देखील प्रकाश टाकते, जिथे ते केवळ कामगिरीच्या पलीकडे जाऊन ‘पाया’ उभारते.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
