cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > चक्रीवादळ दित्वाह: पीडितांच्या मदतीसाठी भारतीय सेनेची एक विशेष तुकडी श्रीलंकेत
National

चक्रीवादळ दित्वाह: पीडितांच्या मदतीसाठी भारतीय सेनेची एक विशेष तुकडी श्रीलंकेत

CliQ INDIA
Last updated: December 4, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE
चक्रीवादळ दित्वाह: पीडितांच्या मदतीसाठी भारतीय सेनेची एक विशेष तुकडी श्रीलंकेत

नवी दिल्ली , 3 डिसेंबर (हिं.स.)।भारताने पुन्हा एकदा ‘शेजारी प्रथम’ धोरणाची उत्तम उदाहरण सादर केली आहे. श्रीलंकेत चक्रीवादळ दित्वाह मुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून, त्या पार्श्वभूमीवर भारताने शेजारी देशाला मदतीचा हात देत ‘ऑपरेशन सागर बंधु’ सुरू केले आहे. भारतीय सेनेची एक विशेष तुकडी बुधवारी श्रीलंकेत पोहोचली असून ती मानवीय आपत्ती निवारण (एचएडीआर ) मोहिमा,बचाव आणि मदत कार्यात मदत करत आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले की भारत श्रीलंकेच्या पूरनिवारण प्रयत्नांमध्ये सातत्याने सहकार्य करत आहे. भारतीय वायुसेनेचे C-17 विमान, ज्यामध्ये वैद्यकीय पथक आणि उपकरणे होती, कोलंबो येथे उतरण्यात आले आहे.

जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले,“भारतीय वायुसेनेचे C-17 वाहतूक विमान — ज्यामध्ये स्वयंपूर्ण, मॉड्युलर फील्ड हॉस्पिटल, 70 हून अधिक वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचारी व वाहने आहेत — कोलंबोला पोहोचले आहे. भारत श्रीलंकेच्या पूरनिवारण प्रयत्नांना सतत मदत करत आहे.”

यापूर्वी भारतातील श्रीलंकेच्या उच्चायुक्त महिषिनी कोलोन यांनी सुनामी, आर्थिक संकट आणि चक्रीवादळामुळे झालेल्या हानीसह विविध कठीण काळात ही भारताने ‘पहिल्या प्रतिसादकर्त्याची’ भूमिका निभावल्याबद्दल प्रशंसा केली. उच्चायुक्त म्हणाल्या, “चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठे नुकसान झाले आहे. 400 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे. आम्ही अजूनही बचाव आणि मदत कार्यात गुंतलेले आहोत. नुकसानाचे संपूर्ण मूल्यमापन करण्यास वेळ लागेल. भारताने नेहमीप्रमाणे सर्वात आधी मदतीचा हात दिला याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. सुनामीच्या वेळी, त्यानंतर आर्थिक संकटात आणि आता चक्रीवादळाच्या वेळी—भारत सर्वात प्रथम धावून आला. भारतीय पथके जमिनीवर बचाव आणि वैद्यकीय सेवा देत आहेत, मोबाइल रुग्णालये कार्यरत आहेत आणि श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहेत. आम्हाला विश्वास आहे की श्रीलंका आणि भारत एकत्र काम करत राहतील आणि ही आपत्ती दोन्ही देशांना आणखी जवळ आणेल.”

दरम्यान श्रीलंकेकडील अहवालांनुसार, चक्रीवादळ दित्वाहमुळे मृतांची एकूण संख्या 410 वर पोहोचली आहे. स्थानिक माध्यमांनी आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या माहितीनुसार सांगितले की 407,594 कुटुंबांतील तब्बल 1.4 दशलक्ष लोक या आपत्तीने प्रभावित झाले आहेत. संपूर्ण बेटावर पूर, भूस्खलन आणि मुसळधार पावसाचा तडाखा सुरूच आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

निवडणूक रोखे प्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी- काँग्रेस
हल्द्वानी हिंसेचा सूत्रधार अब्दुल मलिकला अटक
एनसीसीएफने 50,000 कोटी रुपयांची उलाढाल साधून आत्मनिर्भर व्हावे – अमित शाह
चकमकीत ठार हिडमा फिलीपिन्समध्ये शिकला होता गोरिल्ला युद्ध
भगवान बुद्धांना संपूर्ण जग आशियाचा ज्ञानसुर्य मानते – पंतप्रधान

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ऑस्ट्रेलियामधील सोशल मीडिया बंदीवर यूट्यूबने केली तीव्र टीका
Next Article रायपूर वन-डेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोहलीचे ‘विराट’ शतक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?