cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > पंतप्रधान मोदीं ठरले सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे नेते
National

पंतप्रधान मोदीं ठरले सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे नेते

CliQ INDIA
Last updated: March 23, 2026 6:35 am
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 22 मार्च (हिं.स.)।भारतीय राजकारणात एक महत्त्वपूर्ण इतिहास रचत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातील सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले नेते बनले आहेत. त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडला आहे. ही कामगिरी केवळ आकड्यांची बाब नाही, तर अनेक दशकांतील सातत्यपूर्ण नेतृत्व, जनतेचा पाठिंबा आणि राजकीय स्थिरतेची ही एक गोष्ट आहे.

पंतप्रधान मोदींनी एकूण ८,९३१ दिवस सरकार प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. यामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्यकाळाचा समावेश आहे. यापूर्वी हा विक्रम पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर होता, ज्यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून ८,९३० दिवस काम केले. पंतप्रधान मोदींची ही कामगिरी भारताच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.ते बराच काळ गुजरातचे मुख्यमंत्री होते, नंतर पंतप्रधान झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ते बराच काळ या पदावर राहिले आणि त्यांच्या कार्यकाळात एकही निवडणूक हरले नाहीत. २०१४ साली, पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव प्रस्तावित झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवून पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर त्यांनी २०१९ आणि २०२४ मध्येही सलग विजय नोंदवले. विशेष गोष्ट म्हणजे, त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत ते आतापर्यंत कोणतीही मोठी निवडणूक हरलेले नाहीत.

पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रवासाची आठवण सांगताना म्हटले की, जेव्हा त्यांनी २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हा राज्य मोठ्या आव्हानांना तोंड देत होते. गुजरात भूकंप, चक्रीवादळे, दुष्काळ आणि राजकीय अस्थिरता यांसारख्या समस्यांशी झुंजत होते. ते म्हणाले की, या आव्हानांनी त्यांना अधिक कणखर बनवले आणि त्यांनी आपली सर्व शक्ती राज्याला पुढे नेण्यासाठी समर्पित केली. त्यांनी आपल्या आईकडून मिळालेल्या एका शिकवणीचाही उल्लेख केला: गरिबांसाठी काम करणे आणि कधीही लाच न घेणे, ज्याला त्यांनी आपल्या आयुष्यातील मार्गदर्शक तत्त्व म्हटले.

पंतप्रधान मोदींच्या मते, त्यांच्या कार्यकाळात गुजरातने कृषी, उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती केली आणि एक मजबूत राज्य म्हणून उदयास आले. ते असेही म्हणाले की, २०१४ मध्ये जेव्हा त्यांना पंतप्रधानपदासाठी नामांकित करण्यात आले, तेव्हा देशात विश्वासाचे संकट होते, परंतु जनतेने त्यांना खंबीर पाठिंबा दिला.पंतप्रधान मोदी यांनी असाही दावा केला की, गेल्या ११ वर्षांत २५ कोटींहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले आहेत आणि भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये एक मजबूत देश म्हणून उदयास आला आहे. महिला (नारी शक्ती), युवक आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाची सेवा करणे हा त्यांचा सर्वात मोठा सन्मान आहे. त्यांनी विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या दशकांच्या सेवेचे वर्णन नव्या भारताचा पाया असे केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाची प्रशंसा केली. अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या दशकांच्या सेवेने भारतात एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. त्यांनी गरिबांना सक्षम करण्यात, विकासाला नव्या उंचीवर नेण्यात आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.ते असेही म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी आपले संपूर्ण आयुष्य नव्या भारताच्या उभारणीसाठी समर्पित केले असून ते २४ वर्षांहून अधिक काळ रजेविना देशाची सेवा करत आहेत. अमित शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींना जनतेकडून प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले.

देशातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या नेत्याच्या भूमिकेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे संपूर्ण आयुष्य राष्ट्र आणि जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या वचनबद्धतेपासून ते पंतप्रधान म्हणून त्यांच्या नेतृत्वापर्यंत, त्यांचा प्रवास अविरत सेवा आणि समर्पणाचे उदाहरण आहे. सिंह यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, पंतप्रधान मोदींनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन चामलिंग यांचा ८,९३० दिवसांचा विक्रम मोडत ८,९३१ दिवस सरकारचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. ही एक ऐतिहासिक कामगिरी असल्याचे सांगत ते म्हणाले की, हे राष्ट्र प्रथम विचार, प्रामाणिकपणा आणि प्रत्येक नागरिकाच्या अविरत सेवेचे प्रतीक आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

पंतप्रधान गुरुवारी मथुरेत आयोजित ‘मीराबाई जन्मोत्सवा’त होणार सहभागी
शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरील निवड बेकायदेशीर – अजित पवार गट
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा सुरू
“लाऊडस्पीकर कुठल्याही धर्माचा अविभाज्य भाग नाही”- उच्च न्यायालय | BulletsIn
**GT vs RR IPL 2026: गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे आणि कसे पाहाल?**

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article कतारमध्ये हेलिकॉप्टर अपघात; सहा जण ठार, एक बेपत्ता
Next Article पाण्याचा दिवस की आपल्या अस्तित्वाचा प्रश्न?
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?